TRENDING:

Panchak 2025: भीष्मपंचक लागलंय! पाच दिवस अलर्ट राहा, अन्यथा न भरून निघणारं नुकसान सोसाल

Last Updated:

Panchak 2025: भीष्म पंचकाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या पाच दिवसांमध्ये व्रत, दान, ध्यान आणि भगवान विष्णूची उपासना केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. या कालावधीला वैकुंठ पंचक किंवा हरी पंचक असेही म्हटले जाते..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळ हा अत्यंत संवेदनशील काळ मानला गेला आहे. या काळात विशेष सावधगिरी बाळगावी लागते. पंचक याचा अर्थ पाच भाग किंवा पाच नक्षत्रांचा समूह असा आहे. जेव्हा चंद्र धनिष्ठा, शततारका (शतभिषा), पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या कुंभ आणि मीन राशीतील शेवटच्या पाच नक्षत्रातून प्रवास करतो, तेव्हा पंचक काळ तयार होतो. हा काळ साधारणपणे पाच दिवसांचा असतो आणि या दरम्यान काही विशिष्ट कामे वर्ज्य मानली जातात. शास्त्रांनुसार, पंचकामध्ये शुभ कार्यांसाठीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. असे मानले जाते की या काळात केलेल्या शुभ कार्यांमध्ये वारंवार अडचणी येतात.
News18
News18
advertisement

भीष्म पंचकाचे महत्त्व आणि अर्थ -

द्रिक पंचांगानुसार: 1 नोव्हेंबर 2025 पासून पंचक काळाची सुरुवात होत आहे, पंचक 5 नोव्हेंबर 2025 रोजी समाप्त होईल. यावेळच्या पंचकाला भीष्म पंचक म्हटले जाईल.

पौराणिक मान्यता: महाभारत काळात भीष्म पितामहांनी आपल्या वरदानानुसार इच्छामरणाचे व्रत घेतले होते. युद्धादरम्यान ते बाणांच्या शय्येवर असताना, त्यांनी सूर्याच्या उत्तरायण होण्याची वाट पाहिली.

advertisement

त्या काळात, त्यांनी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतचे पाच दिवस भगवान श्रीकृष्णाचे व्रत, ध्यान आणि उपासनेत घालवले. याच पाच पवित्र दिवसांना भीष्म पंचक असे म्हणतात.

धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व: भीष्म पंचकाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या पाच दिवसांमध्ये व्रत, दान, ध्यान आणि भगवान विष्णूची उपासना केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. या कालावधीला वैकुंठ पंचक किंवा हरी पंचक असेही म्हटले जाते, कारण हा काळ भगवान विष्णूच्या पूजा-आराधनेशी जोडलेला आहे.

advertisement

पैसा, पद-प्रतिष्ठा..! तळहातावर अशी भाग्यरेषा असणारे आयुष्यात मोठं नाव कमावतात

भीष्म पंचकादरम्यान काय करू नये?

नवीन व्यवसाय सुरू करणे.

नवीन घर किंवा गृह निर्माण सुरू करणे.

प्रवास सुरू करणे.

विशेषतः दक्षिण दिशेचा प्रवास करणे टाळावे.

या काळात खरेदी करणे टाळावे.

जर पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला, तर 'अग्नि पंचक दोष' टाळण्यासाठी एक प्रतिकात्मक बाहुली (कणकेची किंवा दर्भाची) बनवून त्यांच्यासोबत अंतिम संस्कार करावे लागतात.

advertisement

हा काळ आत्म-शिस्त, व्रत आणि साधनेचा आहे. त्यामुळे या काळात आळस किंवा जास्त वेळ झोपणे टाळावे. पितामह भीष्म हे धर्म, सत्य आणि आचाराचे प्रतीक मानले जातात. म्हणून या पंचकात खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा इतरांचा अपमान करणे अत्यंत अशुभ मानले जाते.

पंचक काळात काय करावे?

पंचक काळातील अशुभ योगांपासून वाचण्यासाठी खालील उपाय करावेत:

advertisement

भगवान विष्णू आणि हनुमानाची उपासना करावी.

हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे.

दक्षिण दिशेच्या प्रवासाला जाण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून प्रवास करावा.

Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Panchak 2025: भीष्मपंचक लागलंय! पाच दिवस अलर्ट राहा, अन्यथा न भरून निघणारं नुकसान सोसाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल