TRENDING:

एका नावाचे दोन चित्रपट, कथा आणि पात्रही सारखे, एक फ्लॉप तर दुसरा ब्लॉकबस्टर, तुम्ही कोणता पाहिलाय?

Last Updated:

Bollywood Movie : बॉलिवूड अनेक अनोख्या कथांनी भरलेलं आहे. अशा कथांपैकी एक कथा दोन चित्रपटांशी संबंधित आहेत, ज्यांचे नावही एकच आहे आणि त्यांना बनवणारे कुटुंबही एकच आहे, पण यापैकी एक फ्लॉप ठरला तर दुसर्‍याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे एकाच नावाने पुन्हा पुन्हा बनले आहेत. यात 'बरसात' आणि 'आंखें' अशा काही चित्रपटांचाही समावेश आहे. पण यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले. पण तुम्हाला माहिती आहे का की एका नावाची दोन चित्रपट अशी आहेत ज्यापैकी एक वडिलांनी आणि दुसरा मुलाने बनवला आहे? 1990 मध्ये जेव्हा वडिलांनी हा चित्रपट बनवला, तेव्हा तो फ्लॉप ठरला, पण 22 वर्षांनी त्याच चित्रपटाचा रीमेक मुलाने बनवला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. यश जौहर आणि करण जौहर यांनी बनवलेल्या या चित्रपटाचं नाव 'अग्निपथ' असं आहे. 1990 मध्ये अमिताभ बच्चन आणि 2012 मध्ये ऋतिक रोशन यांनी विजय दीनानाथ चौहानची भूमिका साकारली.
News18
News18
advertisement

बॉक्स ऑफिसवर झाले वेगवेगळे रिलीज

यश जौहर यांनी 1990 मध्ये 'अग्निपथ' बनवला आणि त्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. यश जौहर यांचा हा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट होता, पण चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही. त्यामुळे ते खूप निराश झाले.

दुसरीकडे, 2012 मध्ये यश जौहरचा मुलगा करण जौहरने 'अग्निपथ'चा रीमेक बनवला. त्यांनी मूळ चित्रपटाची कथा किंवा पात्रांमध्ये कोणताही बदल केला नाही आणि बॉक्स ऑफिसवर हा रीमेक ऐतिहासिक ठरला. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'अग्निपथ' वर करण जौहरने 58 कोटींचा खर्च केला, तर चित्रपटाने 193 कोटींची कमाई केली. संजय दत्तने खलनायक कांचा चीना यांच्या भूमिकेत धमाल केली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

advertisement

यश जौहर यांच्या चित्रपटांची खासियत

यश जौहर यांना सुरुवातीला फोटोग्राफीमध्ये रस होता, पण नंतर त्यांनी देवानंद साहेबांच्या नवकेतन सिनेमा प्रॉडक्शन हाऊस मध्ये काम सुरू केले. नंतर त्यांनी धर्मा प्रॉडक्शन्स स्थापन केले. या बॅनरअंतर्गत त्यांनी 'दोस्ताना', 'कुछ कुछ होता है', 'अग्निपथ', 'गुमराह' आणि 'कभी खुशी कभी गम' सारखी यशस्वी चित्रपटं निर्माण केली. यश जौहर यांच्या चित्रपटांची खासियत होती भारतीय संस्कृतीची झलक दाखवणं.

advertisement

यश जौहर यांनी 1990 मध्ये 'अग्निपथ' तयार केला. मुकुल एस. आनंद यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यांनी विजय दीनानाथ चौहान या भूमिकेत दाखवले, जो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये जातो. चित्रपटात नीलम कोठारी, डॅनी डेंग्झोंगपा आणि अर्चना पूरनसिंह यांसारखे स्टार होते, तरीही चित्रपट फ्लॉप ठरला. या गोष्टीचा यश जौहर यांना प्रचंड राग आला होता.

advertisement

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण जौहरने बनवला 'अग्निपथ'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

करण जौहरने आपल्या 'An Unsuitable Boy' मध्ये सांगितले आहे की, जेव्हा 'अग्निपथ' बनत होता, तेव्हा यश जौहर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पूर्णपणे खात्री होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल. पण, प्रत्यक्षात चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि यश जौहरचे मन दुखावले. यानंतर 22 वर्षांनी, करण जौहर यांनी आपल्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'अग्निपथ'चा रीमेक बनवला. ऋतिक रोशन आणि प्रियंका चोप्रा स्टारर 'अग्निपथ' सुपरहिट ठरला. चित्रपटाचं बजेट 58 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने भारतात 120 कोटी तर जगभरात 193 कोटींची कमाई झाली.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
एका नावाचे दोन चित्रपट, कथा आणि पात्रही सारखे, एक फ्लॉप तर दुसरा ब्लॉकबस्टर, तुम्ही कोणता पाहिलाय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल