मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
मी अजून पूर्ण निकाल वाचला नाही. मात्र तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर सर्वांनाच मान्य करावा लागेल. 30 वर्ष मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहातोय, असं पहिल्यांदाच घडतंय की निवडणुका पुढे चालल्या आहेत. त्याचे निकाल पुढे चालले आहेत. एकूणच ही पद्धत फार काही योग्य वाटत नाही. नागपूर खंडपीठ आणि निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांनी निकाल दिला तो मान्य करावा लागेल. जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात त्या सगळ्यांचा भ्रमनिरास होतो. सिस्टिम फेल्युअरमुळे काही चूक नसताना त्या ठिकाणी असं सगळं होणं काही योग्य वाटत नाही. अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. यापुढच्या निवडणुकांमध्ये या गोष्टी होणार नाहीत ते निवडणूक आयोगाने येत्या काळात पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.
advertisement
आता माझं मत असं आहे जो काही कायदा आहे त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन करण्यात आले. मी त्यांचा मान राखून सांगतो की खूपच चुकीचे इंटरप्रिटेशन आहे. ज्या लोकांनी कोर्टात धाव घेतली, त्या ठिकाणी त्याने दिलासा ही दिला नाही. हे खूप चुकीचे आहे. मी कालही माझी नाराजी दर्शवली आहे. सगळी प्रक्रिया कायदेशीर होत नाहीए यावर नाराज आहे. काही जणांसाठी २८४ सगळी मतमोजणी थांबवणे योग्य नाही. सगळेच एकमेकांवर आरोप करतात. निवडणूक आयोग आणि पोलिस सज्ज आहेत. मला वाटतं निवडणुका ओव्हर ॲाल शांतपणे पार पडल्या आहेत. काही ठिकाणी टोकाचे झाले तेवढे योग्य नाही.
