एका वृत्तवाहिनीला रेल्वेतील प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेस ही नेहमीप्रमाणे प्रवास करत आहे. अचानक कोणीतरी ट्रेनमध्य आग लागल्याची अफवा पसरली त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यावेळी बंगळुरू एक्सप्रेस समोरून येत होती त्याखाली प्रवासी चिरडले गेले आहेत. यामध्ये अनेक प्रवासी चिरडले गेले आहेत. ट्रेनमध्ये कोणतीही आग लागलेली नव्हती. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारल्याने काही ठिणग्या उडाल्या त्यानंतर आगीची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली.
advertisement
घटना कधी घडली?
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जवळपास 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. यामध्ये सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. तीन रुग्णालयात प्रवाशांना हलवण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहे. पाचोरा स्थानकाजवळ रेल्वे सध्या थांबली आहे
प्राथमिक माहितीनुसार काय घडलं?
जळगावच्या माहेजीजवळ असताना पुष्पक एक्सप्रेस असताना आग लागल्याची अफवा पसरली. कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच डाऊनच्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरून उभे होते तेवढ्यात भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसखाली आल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
