सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्रम इगाप्पागोळ हे ख्रिसमसची सुट्टी पडल्याने आपल्या कुटुंबियाना घेऊन चारचाकीने गावी निघाले होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. हा ट्रक थेट इगाप्पागोळ यांच्या कारवर पलटी झाला होता.त्यामुळे मोठा अपघात घडला होता आणि कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला होता.
advertisement
बंगळुरु जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुलगी दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बंगळुर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते. या अपघातात इगाप्पागोळ यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जत गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सूरू आहे.