घरात शोककळा पसरली होती. नातेवाईक जमा होत होते. वडिलांच्या जाण्याने धनश्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा वेळी पेपर देणे शक्य आहे का, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. पण शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण घातले. ते स्वतः धनश्रीच्या घरी गेले. त्यांनी कुटुंबीयांना समजावले की, आज जर तिने पेपर दिला नाही, तर वडिलांचे स्वप्न अपुरे राहील. शिक्षकांच्या शब्दांवर विश्वास ठेवत कुटुंबाने अंत्यविधी दोन तास पुढे ढकलण्याचा कठोर निर्णय घेतला.
advertisement
Famous Misal Mumbai : मुंबईतील एकमेव ठिकाण, फक्त 25 रुपयांत 5 प्रकारची मिसळ, अशी चव चाखलीच नसेल
डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि हृदयात वडिलांची आठवण घेऊन धनश्री परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिची अवस्था पाहून शिक्षणाधिकारी सचिन जगताप स्वतः केंद्रावर आले आणि तिला आधार दिला. विशेष परवानगीने तिने दीड तासात पेपर पूर्ण केला. पेपर संपताच शाळेचे सेवक संतोष लोंढे यांनी तिला घरी पोहोचवले. एका बाजूला पितृछत्र हरपल्याचे दुःख, तर दुसऱ्या बाजूला भविष्याची जबाबदारी… या कठीण प्रसंगात धनश्रीने दाखवलेले धैर्य सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले.






