झारखंडमध्ये सध्या JMM, काँग्रेस,RJD आणि डावे यांचं युती सरकार आहे, ज्यांच्याकडे विधानसभेच्या 81 पैकी56 जागा आहेत. पण जर JMM ने भाजपसोबत युती केली तर बहुमतासाठीचा आकडा सहज गाठू शकतात. संभाव्य परिस्थितीत JMM ( 34) आणि भाजप ( 21) बरोबर LJP, AJSU आणि JDU च्या प्रत्येकी एक जागेसह 58 पर्यंत पोहचू शकतात. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहेत. त्यामुळे सरकार सहज स्थापन करता येणार आहे.
advertisement
सरकार स्थिर असून कार्यकाळ पूर्ण करणार
यासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राकेश सिन्हा प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, ज्यांना असे वाटते ते मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. भाजपकडे आता कोणतेही काम उरलेले नाही, अशा अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. भाजपचे अनेक आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. सरकार स्थिर असून कार्यकाळ पूर्ण करेल.
भाजपने चर्चा फेटाळल्या
दुसरीकडे, भाजपनेही या चर्चांचे खंडण केले असून चर्चा निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे जर कोणाला असे वाटत असेल की भाजप आणि झामुमो भविष्यात एकत्र सरकार स्थापन करतील, तर ते अशक्य आहे. आम्ही त्यांच्या विचारांना विरोध करतो आणि ते आमच्या विचारांना विरोध करतात. त्याच्यावर असंख्य आरोप आहेत. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन दिल्लीला का गेला आहे हे तेच सांगू शकतात.
