TRENDING:

माझ्यामुळे कोणाला त्रास नको, मरण आलं तर..., हळहळल्या उषा ताई, सांगितली शेवटची इच्छा

Last Updated:
Usha Nadkarni : काम करताना मरण आलं पाहिजे, आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, असं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/7
माझ्यामुळे कोणाला त्रास नको, मरण आलं तर..., हळहळल्या उषा ताई
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या आपल्या विधानामुळे चर्चेत आहेत. काम करताना मरण आलं पाहिजे, असं वक्तव्य उषा नाडकर्णी यांनी केलं आहे.
advertisement
2/7
अभिजात मराठी ओटीटीसोबत बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या,"काम करताना मरण आलं पाहिजे. मजा येईल मला. आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको घ्यायला".
advertisement
3/7
उषा नाडकर्णी म्हणाल्या,"आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको आणि लोक आपल्यासाठी जे करतात ते पाहून मला वाईट वाटायला नको. म्हणजे मी आजारी पडली तर माझ्या मुलाला त्रास होणार. मग तो त्याच्या बायको, मुलीला बघणार की मला बघणार".
advertisement
4/7
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या,"माझ्या शेजारी राहणाऱ्या बंगाली कुटुंबाने मला सांगितलं आहे की कधीही काही अडचण आली तर लाजू नका. मध्यरात्री कधीही फोन करू शकता".
advertisement
5/7
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीदेखील याआधी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. "मी कधी गचकेल माहिती नाही", असं उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या.
advertisement
6/7
उषा नाडकर्णी यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. आता त्यांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
7/7
उषा नाडकर्णी या इंडस्ट्रीची 'आऊ' आहेत. अनेक 'पवित्र रिश्ता' या मालिकेतील त्यांची सविता देशमुख ही भूमिका चांगलीच गाजली. तसेच 'माहेरची साडी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रभर लोकप्रिय झाल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माझ्यामुळे कोणाला त्रास नको, मरण आलं तर..., हळहळल्या उषा ताई, सांगितली शेवटची इच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल