वैभवने चिकन-मटन का सोडलं?
वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की त्यांच्या मुलाने आता मटण आणि चिकन खाणे सोडून दिले आहे. या महत्त्वाच्या निर्णयामागील कारण वैभवच्या फिटनेसशी संबंधित आहे. टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात लवकरात लवकर स्थान मिळवण्यासाठी आणि 2028 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी, फॉर्म आणि फिटनेस दोन्ही आवश्यक आहेत. वैभवला मटन आणि चिकन किती आवडते हे अनेकांना माहिती आहे. तो पूर्वी ते खूप आवडीने चिकन- मटन खात असे, पण आता तो त्याचे हे आवडते अन्न सोडायलाही तयार झाला आहे.
advertisement
काय आहे वैभवचा डाएट प्लान?
संजीव सूर्यवंशी यांनी सांगितलं की, वैभव आता मांसाहारी वरून शाकाहारी झाला आहे. तो आता मटन आणि चिकन ऐवजी डाळ आणि हिरव्या भाज्या खात आहे. मुलाखतीत त्याच्या वडिलांनी खुलासा केला की वैभव आता मटन आणि चिकनपेक्षा जास्त पनीर खातो.
माझा मुलगा तयार आहे, त्याला सीनियर टीममध्ये कधी संधी द्यायची? हे आता बीसीसीआयला ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया वैभवच्या वडिलांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी क्रिकेटपटूचं वय 15 वर्ष असणं गरजेचं आहे. आयसीसीने खेळाडूच्या वयाची मर्यादा निश्चित केली आहे. आयपीएल 2026 नंतर वैभव 15 वर्षांचा होईल, त्यामुळे त्याला आयपीएल 2026 नंतर भारताच्या टी-20 टीममध्ये संधी मिळू शकते, असा विश्वास त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी व्यक्त केला आहे.
