
जालना: भारताच्या जडणघडणीत पारशी समजाचा मोठा वाटा आहे. पर्शियातून आलेले पारशी बांधव ब्रिटिश काळात संपूर्ण भारतभरात विखुरले गेले. जालना शहरातही काही लोक या काळात वास्तव्यास होते. सध्या ते या ठिकाणी वास्तव्यास नसले तरी त्यांच्या वास्तव्याच्या पाऊखुणा आजही याठिकाणी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच पारशी समाजाची स्मशानभूमी. या स्मशानभूमीत पारशी लोकांचे अंत्यविधी कसे केले जात होते? आपण इतिहास अभ्यासक रवीचंद्र खर्डेकर यांनी माहिती दिलीये.