आजचं हवामान: मराठवाड्यात दुपारी धोका वाढणार, पुन्हा तेच संकट, बीडसह 4 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेचा पारा चढला असून आज तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आजचा हवामान व तापमानाचा अंदाज जाणून घेऊ.  
1/7
राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात कधी उष्णतेची लाट तर कधी अवकाळी संकट घोंघावत आहे. आज पुन्हा मराठवाड्यावर नवं संकट येण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील तापमान आणि हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ. 
राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात कधी उष्णतेची लाट तर कधी अवकाळी संकट घोंघावत आहे. आज पुन्हा मराठवाड्यावर नवं संकट येण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील तापमान आणि हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवणार आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअस ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होईल.
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवणार आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअस ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होईल.
advertisement
3/7
बीड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश राहण्याची शक्यता आहे. 23 एप्रिलला तापमान थोडे वाढून 43 अंशावर जाऊ शकते. बीडमध्ये आकाश स्वच्छ राहील व प्रखर ऊन जाणवेल. पुढील काही दिवसही उन्हाचा जोर कायम राहणार आहे.
बीड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश राहण्याची शक्यता आहे. 23 एप्रिलला तापमान थोडे वाढून 43 अंशावर जाऊ शकते. बीडमध्ये आकाश स्वच्छ राहील व प्रखर ऊन जाणवेल. पुढील काही दिवसही उन्हाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
4/7
लातूर जिल्ह्यातही 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश आणि किमान तापमान 27 अंश राहील. 23 एप्रिलला तापमान 42 अंशापर्यंत वाढू शकते. येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहील व उन्हाचा तडाखा अधिक जाणवेल. त्यामुळे दिवसा थेट सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे व शक्य असल्यास घरात राहून आवश्यक काळजी घ्यावी. शेतकरी आणि मैदानी कामगारांनी विशेष काळजी घ्यावी.
लातूर जिल्ह्यातही 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश आणि किमान तापमान 27 अंश राहील. 23 एप्रिलला तापमान 42 अंशापर्यंत वाढू शकते. येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहील व उन्हाचा तडाखा अधिक जाणवेल. त्यामुळे दिवसा थेट सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे व शक्य असल्यास घरात राहून आवश्यक काळजी घ्यावी. शेतकरी आणि मैदानी कामगारांनी विशेष काळजी घ्यावी.
advertisement
5/7
धाराशिव जिल्ह्यात 22 एप्रिलला कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश राहील. 23 एप्रिल व त्यानंतर काही दिवस तापमान 43 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. येथेही आकाश स्वच्छ राहिल्यामुळे प्रखर ऊन जाणवेल. उष्माघात टाळण्यासाठी थंड पेय सेवन करणे, थेट ऊन टाळणे आणि शक्यतो घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात 22 एप्रिलला कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश राहील. 23 एप्रिल व त्यानंतर काही दिवस तापमान 43 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. येथेही आकाश स्वच्छ राहिल्यामुळे प्रखर ऊन जाणवेल. उष्माघात टाळण्यासाठी थंड पेय सेवन करणे, थेट ऊन टाळणे आणि शक्यतो घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
6/7
नांदेड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी सर्वाधिक उष्णतेचा अनुभव येणार आहे. येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस व किमान तापमान 28 अंश राहील. 23 एप्रिल आणि पुढील दोन दिवसही उष्णतेचा जोर राहण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी सर्वाधिक उष्णतेचा अनुभव येणार आहे. येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस व किमान तापमान 28 अंश राहील. 23 एप्रिल आणि पुढील दोन दिवसही उष्णतेचा जोर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, हलके व सैलसर कपडे घालावेत आणि बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे जाणवली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, हलके व सैलसर कपडे घालावेत आणि बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे जाणवली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement