मुंबई: आजच्या काळात सोशल मिडिया हे सर्वात भक्कम माध्यम समजलं जातं. कारण, अनेक तरुणाई या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असते आणि कोणत्याही विषयावर इथे पटकन आपली मत मांडता येतात किंवा आपला विचार लोकांपर्यंत सहज अवघ्या काही सेकंदात पोहोचवता येतो आणि हीच गोष्ट अनेक तरुण मनावर घेत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक गोष्टी आहेत ज्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. असेच आता सोशल मीडियावर सकारात्मक बदल घडवणाऱ्या तरुणांमध्ये दादरचा मयुरेश गुजर हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे. त्याने सुरू केलेली ‘पाप पुण्य का हिसाब’ ही सिरीज आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी नव्हे तर खऱ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ओळखली जाते.
Last Updated: December 09, 2025, 16:02 IST