महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट! 2 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचं संकट

राज्यात येत्या 24 तासांत पावसाचा जोर जास्तच वाढणार आहे

आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट राहील असा इशारा हवामान विभागाने दिला

कोकणात आज काही अंशी ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर पुढचे तीन दिवस रिमझिम पावसाच्या सरी बरसणार आहेत

पश्चिम महाराष्ट्रात आज 50 किमी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे