ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ नेमकी काय आहे?

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचा निर्णय घेतला 

तीर्थयात्रा करू न शकणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे

प्रवास, निवास आणि भोजन यांसह सर्व खर्चासाठी प्रति व्यक्ती कमाल ३० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली

या योजनेचा लाभ राज्यातील सर्व धर्मीय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे

या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पोर्टल, मोबाईल अॅप किंवा सेतू सुविधा केंद्रांमार्फत करता येणार आहे