‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना नेमकी काय आहे?

राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात यात ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ आहे

या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळत असून त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे

या योजनेचा लाभ ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे,आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घेता येतो

एका कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो, मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते