तुळशीला पाणी का घालावं?

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं.

त्यामुळेच अनेक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. 

रोज सकाळी तुळशीला पाणी घालण्याचं अनेक फायदे आहेत, हे फायदे नेमके काय आहेत हे आपण पाहूया.

छत्रपती संभाजीनगरमधील गुरुजी आनंद कळवे यांनी ही माहिती दिली आहे.

तुळशीला पाणी घातल्यानंतर घरामध्ये सूख, शांती, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे.

या धार्मिक महत्त्वाप्रमाणेच तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

दररोज तुळशीजवळ काही काळ बसल्यास अस्थमा आणि श्वसनाचे इतर विकार दूर होण्यास मदत होते.

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची चार पानं खाल्ल्यास डायबेटीस,वात,पित्त आणि कॅन्सरसाख्या आजारांपासून संरक्षण होऊ शकतं.

तुळशीमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात तुळशीची पानं घालून पाणी ठेवल्यास ते शुद्ध होतं.

तुळशीमध्ये अँटिबायोटिक गुणधर्म आहेत. तुळशीची पानं घालून चहा प्यायल्यास रोगप्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते.

स्त्रीला लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं म्हणूनच घरातील लक्ष्मीने सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी घालावं यामुळे घरात समाधान शांती ही लाभते.

तसेच आपण घरात नवीन दाखवताना देखील नव्या वरती तुळशीचे पाणी ठेवल्याने खूप शुभ मानलं जातं, अशी माहिती आनंद कळवे यांनी दिली आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)