नुकतंच अभिनेता गोविंदा अहुजाने एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने स्पष्ट केलं की, "मी माझ्या फॅमिलीसाठीच राजकारणातून एक्झिट घेतली आहे. मी निर्माते नाडियाडवाला यांना सांगितलं की, तुम्ही माझ्या मुलाला चित्रपट कसे बनवायचे? याबद्दलचे ज्ञान द्या. शिवाय त्याला अभिनयाचेही धडे द्याल. माझं सर्वाधिक लक्ष राजकारणातच होतं. त्यामुळे माझं माझ्या फॅमिलीकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणून मी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे."
advertisement
गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेता गोविंदाने मुलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलगा आणि मुलीच्या दृष्टीने अभिनेत्याने राजकारण सोडलं आहे. राजकारणाचा कुटुंबावर परिणाम होऊ नये, यासाठी अभिनेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक्झिट घेतल्याचे बोलले जात आहे. अभिनेता गोविंदाने मार्च 2024 मध्ये म्हणजेच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता. गोविंदाने लोकसभा निवडणूकीच्या वेळी आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळीही प्रचारासाठी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अभिनेत्याने सभेमध्ये भाषणही केलं होतं. अभिनेत्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
