ई-रिक्षा बंद असण्याचे कारण काय?
दरम्यान माथेरानमधील ई-रिक्षा सुविधेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद राहणार आहेत. यामागे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणं हे प्रमुख कारण आहे.
मुदत संपली तरी ई-रिक्षा अद्याप अपुऱ्या
माथेरानमध्ये आजही हातरिक्षा ओढणारे श्रमिक प्रवाशांची वाहतूक करतात. त्यांच्या कष्टांना पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टाने पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र सहा महिन्यांची मुदत उलटूनही 94 हातरिक्षांऐवजी पूर्ण क्षमतेने ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.
advertisement
सध्या फक्त 20 हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा देण्यात आल्या आहेत. उर्वरित चालकांना अद्याप पर्याय न मिळाल्याने श्रमिक रिक्षा संघटनेने ई-रिक्षा आणि हातरिक्षा दोन्ही सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याचे सांगत सहा महिन्यांत 94 हातरिक्षा बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आज 6 फेब्रुवारी रोजी ही मुदत संपली असतानाही या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही.
