TRENDING:

Navi Mumbai : वर्षांपासूनचे संबंध अन् एका रात्रीत सगळं संपलं; कोपरखैरणेतील प्रकाराने पोलिसही हादरले

Last Updated:

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. समोर आलेल्या या प्रकारने प्रत्येक सर्वसामान्य माणूस घाबरलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. गेल्या 15 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या एका ज्वेलरने ग्राहकांचे गहाण ठेवलेले 988 ग्रॅम सोनं आणि सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे.
navi mumbai crime news
navi mumbai crime news
advertisement

ज्वेलर्सवर ठेवलेला विश्वास नडला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाशी संबंधित असून रुपेश गुर्जर असे आरोपीचे नाव आहे असे समोर आले आहे. त्याच्यासोबत काम करणारा सुरेश हाही बेपत्ता असल्याची माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिली आहे.

गुर्जर ग्राहकांकडून सोनं गहाण ठेवून त्यावर व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता. परिसरातील अनेक कुटुंबांनी वर्षानुवर्षे विश्वासाने दागिने त्याच्याकडे ठेवले होते. मात्र काही दिवसांपासून फोन लागत नसल्याने संशय बळावला. ग्राहक दुकानात पोहोचले असता 22 जानेवारीपासून दुकान बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

advertisement

या प्रकरणातील तक्रारदार अमित फुलचंद चौहान (वय 36) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. चौहान हे कोपरखैरणे सेक्टर 19A येथे कुटुंबासह राहतात आणि पाण्याची टपरी चालवतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांपासून महालक्ष्मी ज्वेलर्स कोपरखैरणे भागात आहे.

07 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने दागिने गहाण ठेवून ८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यानंतर त्यांनी दोन टप्प्यांत संपूर्ण रक्कम परत केली. 30 ऑक्टोबर 2025 रोजी 4 लाख रुपये आणि 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा 4 लाख रुपये देण्यात आले. या व्यवहाराबाबत व्हॉट्सअॅपवर संभाषण देखील झाले असून आरोपीने पैसे मिळाल्याचे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

advertisement

तरीही वारंवार मागणी करूनही दागिने परत देण्यात आले नाहीत. 27 जानेवारी 2026 रोजी रुपेश गुर्जरने 2 ते 3 दिवसांत दागिने देतो असे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर त्याचा आणि त्याचा साथीदार सुरेशचा फोन बंद लागला. 03 फेब्रुवारी रोजी चौहान दुकानात गेले असता 22 जानेवारीपासून दुकान बंद असल्याचे समोर आले. परिसरात चौकशी केली असता दोघेही अचानक गायब झाल्याचे समजले.

advertisement

एकामागून एक तक्रारी; आतापर्यंत 28 जणांचा सहभाग

या प्रकरणात आतापर्यंत 28 तक्रारदार पुढे आले असून त्यांनी 18 ते 24 कॅरेट दरम्यानचे दागिने गहाण ठेवले होते. प्रत्येकाचा कालावधी आणि किंमत वेगवेगळी असली तरी सध्याच्या सोन्याच्या दरानुसार एकूण किंमत दीड कोटी रुपयांच्या घरात जाते. पोलिसांच्या मते, तक्रारदारांची संख्या आणि एकूण रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

advertisement

विश्वासाने ठेवलेलं सोनं बुडाल्याने कुटुंबे अडचणीत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मैत्री, प्रेम आणि लग्न! पुणेकर समीर–अमित जिंकले पण...,संघर्ष कधी संपणार? Video
सर्व पहा

फसवणूक उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. काहींनी लग्नासाठी ठेवलेले दागिने तर काहींनी आपत्कालीन गरजेसाठी ठेवलेले सोनं गमावल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. CCTV,आर्थिक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : वर्षांपासूनचे संबंध अन् एका रात्रीत सगळं संपलं; कोपरखैरणेतील प्रकाराने पोलिसही हादरले
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल