टीम इंडियाच्या या पॉवर हिटिंगवर श्रीलंकेच्या खेळाडूने आरोप केला आहे. भारतीय खेळाडू विशेष बॅट वापरत असल्याचा आरोप श्रीलंकेचा बॅटर भानुका राजपक्षे याने केला आहे. भारतीय खेळाडू जी बॅट वापरत आहेत, त्यातून जास्त शक्ती निर्माण होत असल्याचं भानुका राजपक्षे म्हणाला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने आयर्लंडवर 20 रननी विजय मिळवला, त्यानंतर भानुका राजपक्षेने हे आरोप केले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार बॅट या फक्त लाकडापासून बनवल्या गेल्या पाहिजेत. दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या बॅट या वापरता येत नाहीत. आयसीसीच्या सामन्यांमध्ये बॅटचा आकार आणि बॅट बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्याचा मर्यादांचं कठोर पालन करणं बंधनकारक असतं. बॅटची पॉवर वाढवणाऱ्या वस्तू बॅटमध्ये लावल्या तर ते आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन ठरतं. प्रत्येक सामन्याआधी आयसीसी खेळाडूंच्या बॅटची तपासणी करते.
advertisement
काय म्हणाला भानुका राजपक्षे?
'भारतीय खेळाडूंकडे अशा बॅट आहेत ज्या आपल्याला मिळणाऱ्या सर्वोत्तम बॅटपेक्षा खूपच चांगल्या दर्जाच्या आहेत. या बॅटवर रबराचा थर लावला गेला आहे, असं वाटतं. हे कसं शक्य आहे मला माहिती नाही. इतर खेळाडू या बॅट विकत घेऊ शकत नाहीत, आणि हे सगळ्या खेळाडूंना माहिती आहे. भारतीय खेळाडू जास्त पॉवर निर्माण करणाऱ्या बॅट वापरतात', असं भानुका राजपक्षे म्हणाला आहे.
