अनेकदा आपल्याला दिवसभर कामात असताना किंवा रात्री शांत झोपलेले असताना अचानक शरीराच्या विशिष्ट भागावर खाज सुटू लागते. आपण ती एखादी साधी ॲलर्जी किंवा उष्णतेचा त्रास म्हणून सोडून देतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते तुमची त्वचा ही तुमच्या शरीराचा आरसा असते. जेव्हा शरीराला आतून योग्य पोषण मिळत नाही, तेव्हा त्वचा कोरडी, निस्तेज आणि संवेदनशील होऊन खाज सुटण्यास सुरुवात होते.
advertisement
चला तर मग समजून घेऊया, नेमक्या कोणत्या जीवनसत्त्वांच्या (Vitamins) कमतरतेमुळे हा त्रास होऊ शकतो आणि तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात.
1. व्हिटॅमिन 'ए' (Vitamin A): त्वचेचा नैसर्गिक ओलावा
व्हिटॅमिन 'ए' आपल्या त्वचेला मऊ आणि निरोगी ठेवण्याचे मुख्य काम करते. जर तुमच्या शरीरात याची कमतरता असेल, तर त्वचा खडबडीत आणि पपड़ीदार (Scaly) होऊ लागते. विशेषतः कोपर, गुडघे आणि घोट्यांच्या आसपास जर जास्त खाज सुटत असेल, तर हे व्हिटॅमिन 'A'च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
2. व्हिटॅमिन 'बी12' (Vitamin B12): मज्जासंस्थेशी संबंधित खाज
व्हिटॅमिन बी12 हे रक्त आणि मज्जासंस्था (Nerves) या दोघांसाठी अत्यंत आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे त्वचेवर लालसर चट्टे येणे, जळजळ होणे किंवा हाता-पायांना मुंग्या येऊन खाज सुटणे असे प्रकार घडतात. जर तुम्हाला खाजेसोबतच त्वचेत टोचल्यासारखे वाटत असेल, तर वेळीच बी12 ची चाचणी करणे गरजेचे आहे.
3. व्हिटॅमिन 'बी3' (Niacin): त्वचेची संवेदनशीलता
व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील बनते. यामुळे त्वचा लाल होणे, त्वचा सोलवटणे आणि तीव्र खाज येणे असे त्रास होतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये त्वचेवर लहान जखमा देखील होऊ शकतात.
4. व्हिटॅमिन 'सी' (Vitamin C): त्वचेची दुरुस्ती आणि ताकद
त्वचेची दुरुस्ती (Repairing) करण्यासाठी व्हिटॅमिन 'सी'ची गरज असते. हे जीवनसत्त्व कमी पडल्यास त्वचा कमकुवत आणि कोरडी होते. परिणामी, त्वचेवर छोटे दाणे येणे आणि सतत खाज सुटणे या समस्या उद्भवतात.
5. व्हिटॅमिन 'ई' (Vitamin E): संरक्षणात्मक कवच
व्हिटॅमिन 'ई' हे त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते. हे त्वचेला ओलावा देते आणि बाह्य नुकसानापासून वाचवते. याची कमतरता भासल्यास त्वचा आपली लवचिकता गमावते, ज्यामुळे त्वचा बेजान होऊन खाज सुटू लागते.
प्रसिद्ध तज्ज्ञ व्ही. के. पांडे यांच्या मते, त्वचेच्या समस्यांना केवळ क्रीम लावून बरे करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या आहारात बदल करणे अधिक प्रभावी ठरते. हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आणि दूध यांसारख्या पदार्थांचा समावेश केल्यास या जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढता येते. जर तुमची खाज घरगुती उपायांनी किंवा योग्य आहार घेऊनही थांबत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते.
