मिटकरी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्हीएसआर (VSR) कंपनीवर गंभीर संशय व्यक्त केला. अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीवर आधीच बंदी होती आणि तरीही तेच विमान २८ तारखेला प्रवासासाठी देण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये या कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटचा ५० कोटी रुपयांचा विमा (Insurance) उतरवला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
या घटनेत 'सुसाईड बॉम्बर'चा अँगल असावा का, अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हिप्नोटाईज करून अशा व्यक्तींचा वापर केला जातो, असा संदर्भ देत त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा आणि अजमल कसाबचा उल्लेख केला. पायलटने आपत्कालीन परिस्थितीत दिला जाणारा 'मेडे' (MAYDAY) कॉल का दिला नाही, असा तांत्रिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विमा कंपनीने ५० कोटींचे आमिष दाखवून पायलटला हे कृत्य करायला लावले का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले. टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच पुणे कव्हर करणे शक्य असताना पायलटने तसे का केले नाही, यावरून त्यांनी कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व शंकांमुळे हा अपघात नसून एक मोठे षडयंत्र असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सुनेत्रा वहिनी याच अजितदादांच्या खऱ्या उत्तराधिकारी आहेत. अजित पवार यांची जागा त्याच घेऊ शकतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत विचार करु, असं कोणी बोलत असेल तर त्याला आमचं समर्थन नाही. अजितदादांनंतर त्या जागेवर सुनेत्रा वहिनींचाच अधिकार आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
