पतीने अखेर न्यायालयात धाव घेतली आणि लग्न रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने फक्त 7 महिने आणि 16 दिवसांमध्ये हा दावा निकाली काढून लग्न रद्द केलं. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.कदम यांनी हा निर्णय दिला.
27 वर्षांचा पती आणि 24 वर्षांच्या पत्नीचं लग्न जून 2024 मध्ये झाला होता, पण लग्नानंतर मुलीने संबंध प्रस्थापित करायला नकार दिला. तसंच आई-वडिलांच्या जबरदस्तीमुळे हे लग्न झालं असून, मला हे लग्न मान्य नाही, असं मुलीने पतीला सांगितलं. यानंतर पत्नी 20 दिवसांमध्येच नवऱ्याचं घर सोडून गेली होती. पत्नी घरी येत नसल्याचं लक्षात येताच पतीने मे 2025 मध्ये न्यायालयात धाव घेतली आणि लग्न रद्द करण्याची मागणी केली. पतीची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.
advertisement
पुण्यात दुसरी घटना
याआधी डिसेंबर महिन्यामध्येही पुण्यातच प्रेम विवाह केलेल्या जोडप्याने 24 तासांमध्येच कायदेशिररित्या त्यांचं लग्न संपवण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही जण एकमेकांना दोन ते तीन वर्षांपासून ओळखत होते, यानंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं. लग्न केलेली महिला पेशाने डॉक्टर तर पुरुष इंजिनिअर आहे. फक्त वैचारिक मतभेद असल्याच्या कारणामुळेच दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला.
