परंपरागत पुरणपोळी बनवण्यास तासन् तास लागतात, त्यामुळे घरात तिचा वापर कमी झाला होता. पल्लवी यांनी वेळेची बचत, आरोग्य आणि घरगुती चव यांचा विचार करून हा प्रिमिक्स तयार केला. शेतकऱ्यांकडून विनापॉलिश हरभऱ्याची डाळ घेऊन केमिकल-मुक्त शिजवली जाते. तेलाचा वापर न करता सेंद्रिय गूळ, हळद आणि वेलची पावडर टाकली जाते. फक्त पाणी मिसळून गोळा करा, कणिक लाटा आणि तव्यावर 5-10 मिनिटांत पुरणपोळी तयार होते.
advertisement
यासोबतच कटाची आमटीचा प्रिमिक्सही उपलब्ध आहेत. त्यात कट, गूळ, चिंच, मसाले, कढीपत्ता पावडर, तिखट-मीठ असून, तेलाची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटांपर्यंत उकळून घ्यायचं आणि कटाच्या आमटीचा प्रिमिक्स तयार होतो . पुरणपोळीच्या प्रिमिक्सचे पाकीट किंमत 150 ते 800 रुपयांपर्यंत पल्लवी वाले यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामधून त्यांची महिन्याला 1 लाखांची कमाई होते. घरामध्ये सुरू केलेल्या या व्यवसायाने पल्लवी यांनी महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून धावपळीतही महाराष्ट्रीय स्वाद जपण्याचा हा प्रयत्न लोकप्रिय होत आहे.