रेल्वेचा नवा गेमचेंजर प्रकल्प
मनमाड-कसारा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाइनसाठी मंजूरी आता मिळाली आहे त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल 10,154 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. सुमारे 135 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मार्गातील 'ही' मुख्य समस्या संपणार
मनमाड-कसारा तिसरा आणि चौथा मार्ग सुरू झाल्यानंतर कसारा घाटातील चढ-उताराचा ताण कमी होणार असून गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर) लावण्याची गरज भासणार नाही. यामुळे तिथे लागणारा वेळ वाचणार आहे.
advertisement
प्रवासाचा वेग दुप्पट होणार
कसारा घाटात गाड्यांचा वेग कमी होणे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना सहन करावा लागणारा त्रास आता कमी होणार आहे. यामुळे अंदाजे 25 ते 30 मिनिटांनी कमी होईल. गाड्यांची संख्या वाढवल्याने प्रवासी वाहतूक क्षमता सुमारे 30 टक्क्यांनी वाढणार आहे.
घाटातील वाहतुकीतून प्रदूषण कमी
पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. कसारा घाटात गाड्यांना कमी ऊर्जा लागल्याने दरवर्षी सुमारे 54 कोटी किलो कार्बन उत्सर्जन घटेल. हा परिणाम तब्बल 2.2 कोटी झाडे लावण्याइतका पर्यावरणाला लाभदायी ठरेल.
