T20 World Cup : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टॉस हरला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल? 5 पॉईंट्समध्ये समजून घ्या
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना युएसएविरुद्ध होत आहे.
advertisement
1/5

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि युएसए यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा सामना होत आहे. या सामन्यात अमेरिकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. बुमराहला बरं नसल्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळत नाहीये. याशिवाय संजू, सुंदर आणि कुलदीपलाही संधी मिळालेली नाही.
advertisement
2/5
भारत आणि युएसए यांच्यामध्ये आतापर्यंत फक्त एकच आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच झाली आहे. 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला होता.
advertisement
3/5
2024 ची गतविजेती असलेली टीम इंडिया यंदा टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वत:कडेच राहावी, यासाठी मैदानात उतरली आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाने एकही टी-20 सीरिज गमावलेली नाही. टी-20 वर्ल्ड कप 2024 पासून टीम इंडियाने एकूण 9 सीरिज जिंकल्या आहेत.
advertisement
4/5
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबत पाकिस्तान, युएसए, नामिबिया आणि नेदरलँड्स या टीम आहेत.
advertisement
5/5
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टॉस हरला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल? 5 पॉईंट्समध्ये समजून घ्या