शुक्रवारी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेली रोमांचक फायनल भारताने जिंकली. यानंतर भारतीय खेळाडू मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. भारतातील अनेक तरुण खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांनी आरतीची थाळी घेऊन त्यांचे स्वागत केले. कॅमेऱ्यांसह मीडियाही तिथे पोहोचला. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेसह भारतीय खेळाडू गर्दीतून जात असताना कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
advertisement
वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी 175 रनच्या खेळीच्या जोरावर, भारताने 2026 च्या आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये विक्रमी सहावा विजेतेपद पटकावले. भारताने पहिले फलंदाजी करताना 411 रनचा डोंगर उभा केला, तर इंग्लंडने पाठलागात धाडसी प्रयत्न केले. आयुष म्हात्रे आता कर्णधार म्हणून अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या यादीत सामील झाला आहे. भारताने शेवटचा अंडर-19 वर्ल्ड कप 2022 मध्ये जिंकला होता.
