यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तानला भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड सामना खेळण्यास नकार देण्यासाठी "फोर्स मॅजेअर" (नियंत्रणाच्या बाहेरची स्थिती) तरतुदीचा वापर कसा करता येईल हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकारवर जबाबदारी टाकत परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
या महत्त्वाच्या बैठकीमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. चर्चा सुरू झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी होणारा महत्त्वाचा सामना खेळला जाईल अशी आशा आयसीसीच्या एका संचालकाने व्यक्त केली.
advertisement
सरकारी निर्देशांनुसार टीम स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्यास तयार असताना फक्त एका सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय कसा योग्य ठरू शकतो? असा प्रश्न आयसीसीने यापूर्वी पीसीबीला विचारला आहे.
काही दिवसांपूर्वी, पीसीबीने अधिकृतपणे आयसीसीला "फोर्स मॅज्युअर" तरतुदीची अंमलबजावणी करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले. त्यात 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारताविरुद्धच्या सामन्यापासून टीमला दूर राहण्याचे निर्देश देणाऱ्या सरकारच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख केला होता.
या विषयावर चर्चा करण्यासाठी पीसीबीने आयसीसीशी संपर्क साधला आणि जागतिक संस्थेकडून औपचारिक पत्र मिळाल्यानंतर, पीसीबीने पुढील चर्चा सुरू केली आहे. आयसीसी हे प्रकरण सोडवण्यासाठी पीसीबीशी चर्चा करत आहे. आयसीसीचा असा विश्वास आहे की कोणत्याही एकतर्फी कारवाईपेक्षा खेळाच्या हितांना प्राधान्य दिले पाहिजे.
"फोर्स मॅज्युअर" ही एक कायदेशीर तरतूद आहे जी असाधारण परिस्थितीत टीमला त्याच्या जबाबदाऱ्यांपासून माघार घेण्याची परवानगी देते. यामध्ये युद्ध, नैसर्गिक आपत्ती, सरकारी आदेश किंवा सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितींचा समावेश आहे. जर प्रभावित पक्षाने हे सिद्ध केले की ही घटना अनपेक्षित, अपरिहार्य होती आणि त्याने नुकसान कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तरच ती वैध आहे. केवळ गैरसोय किंवा राजकीय पसंती पुरेशी नाही.
