सिंचन विहिरीं कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहे -
1) शेतक-याकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही
2) लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील.(यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात यावा.)
advertisement
यापूर्वी अर्जदाराने विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
3) लाभार्थ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन असायला हवी, त्याहून कमी क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यास विहीर मंजूर होणार नाही. मात्र दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास सामुदायिक विहीरीची मागणी केली तर ते सामुदायिकरित्या विहीर मिळण्यास पात्र असतील.
4) यासंदर्भात पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी रु 100 च्या स्टॅंम्प पेपर वर करार करावा.
आवश्यक कागदपत्रे काय आहे?
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
आधार कार्ड
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट आकाराचे फोटो
बँक खात्याचा तपशील
रोजगार हमी योजनेचे कार्ड
7/12 व 8अ उतारा
सामूहिक विहीर असेल तर त्याचा सलग जमीन असल्याचा पंचनामा अनिवार्य
अर्ज कसा कराल?
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.
