सूर्यग्रहणानंतर ग्रहस्थितीत उलथापालथ
सूर्यग्रहणानंतर होणारे नक्षत्र परिवर्तन हे सामान्य बदल मानले जात नाही. शतभिषा नक्षत्र राहूशी संबंधित असल्याने अचानक निर्णय, मानसिक अस्थिरता आणि गैरसमज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काही राशींनी या काळात संयम, सावधगिरी आणि विवेक राखणे आवश्यक आहे.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चढ-उतारांचा ठरू शकतो. दैनंदिन कामकाजात घाईगडबड टाळावी लागेल. वाहन चालवताना किंवा प्रवासात विशेष खबरदारी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात कुणावरही अंधविश्वास ठेवू नका; गुंतवणूक किंवा पैसे उधार देण्याआधी सर्व बाजूंनी विचार करा. घरातील वातावरणातही तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संवादात संयम ठेवा.
advertisement
उपाय: दररोज सकाळी सूर्य बीज मंत्राचा जप केल्यास सकारात्मकता वाढेल.
कन्या राशी
कन्या राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक आयुष्यात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कार्यालयीन राजकारण, गैरसमज किंवा अनावश्यक वाद यांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. सहकाऱ्यांशी संवाद करताना शब्दांची निवड महत्त्वाची ठरेल. कौटुंबिक आयुष्यातही लहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात.
उपाय: रोज तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी अर्पण केल्याने मनःशांती लाभेल.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता असून, त्यामुळे निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या आणि करिअरशी संबंधित मोठे निर्णय तातडीने घेणे टाळा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
उपाय: सूर्य मंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक बळ मिळेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. दिनचर्या विस्कळीत झाल्यास थकवा किंवा किरकोळ आजार उद्भवू शकतात. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास नातेसंबंध टिकून राहतील.
उपाय: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
