पंडित श्रीधर शास्त्री यांच्या मते, लग्नासाठी वधू-वरांच्या कुंडलीत किमान 18 गुण जुळणे गरजेचे आहे. जर 18 गुणांपेक्षा कमी गुण जुळले, तर लग्नानंतर वैवाहिक जीवनात त्रास आणि दुःख उद्भवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य गुण जुळल्याशिवाय विवाह टाळावा असे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Numerology: प्रचंड हुशार असतात या जन्मतारखांच्या व्यक्ती, परीक्षेत कोणीच पकडू शकत नाही हात!
advertisement
मंगळ दोष हे गुण जुळणं मुख्य भाग आहे. वधू किंवा वर यांच्यापैकी कोणाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे का, हे सर्वप्रथम तपासले जाते. दोष असल्यास, योग्य उपाय योजना करून त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, अन्यथा विवाह टिकण्याच्या शक्यता कमी असते.
गुण जुळल्याने दोघांमधील स्वभाव जुळतो, वैवाहिक जीवनात समन्वय राहतो आणि संकटे कमी होतात. परंतु गुण कमी जुळल्यास भविष्यात मतभेद, संघर्ष किंवा लग्न तुटण्याचा धोका असतो.
हे ही वाचा : Astrology: खूपच वाट पाहिली! उच्च राशीत शुक्र आल्याबरोबर सगळं पालटणार, सुवर्णकाळाची सुरुवात
फक्त गुण जुळणेच नाही, तर नाडी दोष, गण दोष यांसारख्या दोषांचेही निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. यामुळे विवाहाचे भविष्य अधिक सुरक्षित होते. कुंडली जुळवणे हा लग्न ठरवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो कोणत्याही प्रकारे टाळू नये.
