TRENDING:

Weather Update: थंडी ओसरली अन् उन्हाचा कडाका वाढला; पुढील 72 दिवस कसं असेल हवामान?

Last Updated:

Mumbai, Ratnagiri, Konkanमध्ये तापमान वाढले असून Maharashtraमध्ये थंडी ओसरली आहे. Vidarbha, Marathwada, Pune, Nashikमध्ये हवामान कोरडे, शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन सुचवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजचं हवामान: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा थंडीचा कडाका आता ओसरू लागला असून राज्याने उन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. उत्तर भारतात Western Disturbance पुन्हा सक्रिय झाला असला तरी, त्याचा परिणाम महाराष्ट्रात थंडी वाढण्याऐवजी तापमान वाढण्यात होत आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एप्रिलसारखी उष्णता जाणवू लागली आहे. या उन्हाच्या झळा मार्चमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

मुंबई आणि कोकणात उन्हाचा तडाखा

हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याच्या किनारपट्टी भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर गेला आहे. मुंबईत कमाल तापमान ३४.५ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. रत्नागिरीत तर पार ३६ अंशांपर्यंत पोहोचला आहे. कोकण किनारपट्टीवर दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली असून, दुपारी उन्हाचे चटके आणि उकाडा असह्य होऊ लागला आहे.

advertisement

उत्तरेतील वाऱ्यांचा जोर ओसरला

गंगा नदीच्या खोऱ्यातून येणारे थंड वारे आता कमकुवत झाले आहेत. उत्तर भारतात जरी ९ आणि १० फेब्रुवारीला पहाडी भागात बर्फवृष्टीची शक्यता असली, तरी त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नाही. उलट, वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आता बहुतांश ठिकाणी रात्रीचे तापमान १० ते १२ अंशांच्या वर गेले असून कडाक्याची थंडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.

advertisement

विदर्भ आणि मराठवाड्यात काय स्थिती?

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसा कडक ऊन आणि रात्री संमिश्र वातावरण राहील. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी तापमानात १ ते २ अंशांची किरकोळ घट होऊ शकते, मात्र ही थंडी फार काळ टिकणारी नसेल.

शेतकऱ्यांसाठी सूचना

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

पुढील एक आठवडा महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही. हवामान शुष्क आणि उष्ण राहणार असल्याने रब्बी पिकांना पाण्याची गरज भासू शकते. वाढत्या तापमानामुळे पिकांमधील ओलावा कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: थंडी ओसरली अन् उन्हाचा कडाका वाढला; पुढील 72 दिवस कसं असेल हवामान?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल