२८ जानेवारी रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास अजितदादांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ घसरलं. या अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणी एकीकडे आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहे. अशातच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी महत्त्वाची माहिती दिली. "अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास हा वेगाने आणि योग्य पद्धतीने सुरू आहे. लवकरच या घटनेबद्दल प्राथमिक अहवाल जाहीर केला जाणार आहे" अशी माहिती नायडू यांनी दिली. AAIB कडून फ्लाइट डेटा, विमानाच्या देखभाल नोंदी, ऑपरेशनल पद्धती आणि निर्णयप्रक्रिया या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे.
advertisement
त्यामुळे अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपासाचा प्राथमिक अहवाल समोर येणार आहे. या अहवालामध्ये अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, विमानात बिघाड होता का, राष्ट्रवादीच्याा आमदारांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, याचे उत्तर आता या अहवालातून मिळणार आहे.
ब्लॅक बॉक्समधून माहिती गोळा करण्याचं काम सुरू
दरम्यान, अजितदादांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स हा अपघाताच्या दिवशीच ताब्यात घेण्यात आला होताा. "ब्लॅक बॉक्स" हा तपास यंत्रणा AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या ताब्यात आहे. अपघाताच्या ८ दिवसांनंतर "ब्लॅक बॉक्स" मधील महत्त्वाची माहिती रिक्व्हर करायला सुरुवात झाली आहे. ब्लॅक बॉक्समधला "डेटा रिकव्हरी" केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार आहे. या अहवालातून त्या दिवशी विमानात काय घडलं होतं, याची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.
