बोटीतून जाणाऱ्या 2 प्रवाशांशिवाय इतर सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातली होती. बोटीतल्या प्रवाशांमध्ये 6 वर्षांच्या लहान मुलांपासून ते महिलाही होत्या, असं दृष्टी मरीनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. समुद्र किनाऱ्यापासून 60 मीटर अंतरावर ही बोट पलटली आहे.
या बोटीमध्ये महाराष्ट्रातल्या खेडचे 13 प्रवासी होते. बोट समुद्रात पलटी होत असल्याचं दिसताच दृष्टी मरीनचे प्रतिनिधी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दृष्टी मरीनच्या 18 जीव रक्षकांनी बोटीवर अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावर सुरक्षित आणलं. यानंतर जखमींना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
जखमी झालेल्या 20 प्रवाशांमध्ये 6 आणि 7 वर्षांची दोन मुलं आहेत. तर 25 आणि 55 वर्षांच्या दोन महिला आहेत. बोटीवर असलेल्या दोन व्यक्तींनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोवा हे लोकप्रिय ठिकाण आहे. संपूर्ण देशच नाही तर परदेशातूनही पर्यटक गोव्यामध्ये येतात, पण ऐन सणासुदीच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा बोटींच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागच्याच बुधवारी मुंबईमध्ये नील कमल ही प्रवासी बोट बुडाली होती, ज्यात 15 जणांना जीव गमवावा लागला होता.
