नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. 'चु.... आहे तो' असं म्हणत संजय राऊत तिथून उठून निघून गेले. मात्र त्यावर बोलणं त्यांनी टाळलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
श्रेयवादाची लढाई
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. मराठी भाषिकांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र आता यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि श्रेयवादाची लाढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.