TRENDING:

12 ते 4 घरीच थांबा! मुंबई-ठाण्यासह 3 जिल्ह्यांत उन्हाच्या झळा तीव्र, स्कायमेटकडून हिटवेवचा अलर्ट

Last Updated:

मुंबई कोकणात उकाडा तर मराठवाडा विदर्भात २५ २६ मार्चला वेस्टर्न डिस्टरबन्समुळे वादळी वारे गारपीट अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईसह उपनगरात उकाडा वाढला आहे. घामाच्या धारा तीव्र झाल्या आहेत, उकाड्याने हैराण व्हायला झालं. मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेल्या उन्हामुळे यंदा प्री-मान्सून वारे वेळेआधीच सक्रिय झाले आहेत. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या २५ आणि २६ मार्च रोजी महाराष्ट्राच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचं संकट

स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी हिंगोली, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होईल. त्याचप्रमाणे सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह विदर्भातील काही भागांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडील हवामानातील बदलांमुळे हा पाऊस पडणार आहे.

advertisement

नेमकं का बदलतंय हवामान?

सध्या भारताच्या उत्तर भागात एकामागून एक 'वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय होत आहेत. येत्या २६ मार्चला अजून एक प्रबळ सिस्टीम उत्तर भारतात धडकणार आहे. त्याचा थेट परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावर होताना दिसतोय. हवेत ओलावा वाढल्यामुळे ढग तयार होऊन अचानक गडगडाटासह पाऊस पडतोय. मार्चमध्येत तापमानाचा पारा हा 40 अंशांवर पोहोचल्याने उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे लहरी हवामान असंच चालू राहण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 50 किमी राहणार आहे. तर दुसरीकडे कोकणात मात्र उकाडा अति प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
12 ते 4 घरीच थांबा! मुंबई-ठाण्यासह 3 जिल्ह्यांत उन्हाच्या झळा तीव्र, स्कायमेटकडून हिटवेवचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल