पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्याम सूर्यवंशी आणि मयत नितीन काळे दोघंही चांगले मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपीनं नितीनला दारु पार्टी करण्यासाठी बोलावून घेतलं होतं. प्यायला बसल्यानंतर आरोपीनं जुन्या वादातून नितीनवर चाकुने वार करून त्याचा जीव घेतला.
दोघांमध्ये नेमका वाद काय होता?
श्याम आणि नितीन यांच्यात जुना वाद होता. श्यामने काचेची बाटली फोडून नितीनवर हल्ला केला होता. या प्रकरणाची केस न्यायालयात सुरू होती आणि त्यासाठीच नितीन गोव्याहून जळगावात आला होता. दरम्यान, केस मागे घेण्यासाठी श्यामकडून दबाव टाकला जात होता. मात्र केस मिटवत नाही. म्हणूनच श्यामने चॉपरने नितीनचा खून केल्याचा आरोप मयताचे वडील नाना काळे आणि भाऊ राजू काळे यांनी केला आहे.
advertisement
तर श्यामने नितीनला दारू पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि जुन्या वादातून त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
