दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यावेळी अजित पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. तेव्हा सुनेत्रा पवारांसोबत एक दोन वेळा भेट झाली होती, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. शिवाय सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वाहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या विलीकरणाची चर्चा तूर्तास बंद करत आहोत, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आक्षेप घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी देखील माघार घेतली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
