नेमके काय घडले?
घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने पवार कुटुंबीय जय्यत तयारी करत होते. त्यासाठी दारात मंडप उभारण्यात आला होता. त्यावर लावलेल्या फोकससमोर मंडपाचे कापड आले होते. त्यामुळे रवी कापड काढण्यासाठी मंडपावर चढला. त्याचा पाय घसरल्याने तो जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या.
‘शेतात पाणी देऊन जत्रेला जा’, 16 वर्षांच्या हरिदासला वडिलांचा राग अनावर, उचललं टोकाचं पाऊल
advertisement
दरम्यान, या अपघातानंतर आई-वडिलांनी तातडीने रवीला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. रवीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील मिळेल ते काम करतात. हाताशी आलेला तरुण अशा दुर्घटनेत गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 8:35 AM IST
