वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (वय 25) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (वय 23) अशी अपघातात मृत्यू झालेल्या नववधू-वरांची नावे आहेत. दोघांचा अवघ्या चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. विवाहाची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षया चव्हाण हिच्या महापारेशनची परीक्षेसाठी दोघे टाटा नेक्सॉन कारने लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कार थेट टोलवेच्या कमानीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला. अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अवघ्या काही दिवसांपूर्वी आनंदात न्हाऊन निघालेल्या दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण तपासण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
