त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्डसाठी खोटी माहिती देत असाल तर आताच सावध व्हा नाहीतर तुम्हालाही त्याचा फटका बसू शकतो.गरिबांच्या ताटातील घास पळवून अनेक श्रीमंत आणि सधन व्यक्तींनी पांढरं रेशन कार्ड खिशात टाकल्याच्या तक्रारी सरकारकडे वाढल्या आहेत.
हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आता थेट घराघरात जाऊन केवायसी करण्याचे निर्णय घेतले आहेत. खऱ्या गरजूंनाच धान्य मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. सरकारने आखलेले नवीन निकष अत्यंत कडक आहेत.
advertisement
घरात एसी किंवा ५ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर असेल. कुटुंबाकडे स्वतःची चारचाकी कार किंवा ट्रॅक्टर असेल. शहरात राहणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांच्या वर आणि ग्रामीण भागात २ लाखांच्या वर असेल. १०० चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचं पक्कं घर असेल. कुटुंबातील कोणताही सदस्य इनकम टॅक्स भरत असाल यापैकी कोणतीही गोष्ट असेल तर तुमचं रेशन कार्ड लगेच रद्द केलं जाईल किंवा बंद केलं जाईल.
ज्यांनी खोटी माहिती देऊन आजवर स्वस्त धान्य लाटलं आहे, त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. जर चौकशीदरम्यान तुम्ही दोषी आढळलात, तर आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली केली जाणार आहे.
इतकंच नाही, तर फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. सध्या सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल, तर तुमचं रेशन तात्पुरतं बंद होऊ शकतं. त्यामुळे रेशन दुकानात जाऊन तात्काळ आपली माहिती अपडेट करून घेणे फायद्याचे ठरेल.
