प्रवासातील अडथळे कायमचे मिटणार
प्रत्येक वेळेला रेल्वे फाटकांमुळे रेल्वेचा वेग कमी करावा लागतो आणि वेळही वाया जातो. साधारण जर पाहिले तर एका फाटकावर 8 ते 10 मिनिटांचा उशीर होतो, त्यामुळे या फाटकांच्या जागी पूल आणि बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी सुमारे 183 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
advertisement
कर्जत-खोपोली लोकल आता वेळेवर धावणार
महत्त्वाचे म्हणजे घेतलेल्या या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत तसेच खोपोल दरम्यान दररोज धावणाऱ्या लोकल गाड्यांना याचा मोठा फायदा होईल. शिवाय मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचाही आणखी वेग वाढेल. अजून एक गोष्ट म्हणजे रेल्वे फाटक कायमचे बंद झाल्याने अपघातांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
पुल कुठे उभारले जाणार आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाअंतर्गत भिवपुरी-कर्जदरम्यान तीन तर बदलापूर-वांगणीदरम्यान दोन आणि वांगणी-शेलूदरम्यान दोन, नेरळ-भिवपुरीदरम्यान दोन तसेच शेलू-नेरळदरम्यान एक असे तब्बल दहा पूल उभारले जाणार आहेत.
