जत्रेच्या दिवसांमध्ये, अंबरनाथ पूर्वेतल्या हिंदू स्मशानभूमीपासून गोविंद तिर्थ पुलापर्यंतचा मार्ग सर्व वाहनासाठी बंद असणार आहे. वैभव हॉटेलकडून हिंदू स्मशानभूमीपासून पुढे वडवली सेक्शन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हुतात्मा चौकाकडून मटका चौकातून पुढे जातील. असा पर्यायी मार्ग असणार आहे. त्यानंतर स्वामी समर्थ चौक परिसरातही काही मार्गांवर प्रवेश बंदी केली जाणार आहे. स्वामी समर्थ चौक परिसरात स्वामी समर्थ चौकाकडून गोविंद तिर्थ पुलामार्गे वैभव हॉटेलकडे जाणाऱ्या तसेच उल्हासनगर कॅम्प पाचमधील कैलास कॉलनीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स्वामी समर्थ चौक येथे प्रवेश बंद असेल.
advertisement
या मार्गाला पर्यायी मार्ग, स्वामी समर्थ चौकातून डाव्या बाजूला वळण घेऊन पुढे रोटरी क्लब वडवली सेक्शन अशी एकतर्फी वाहतूक करून पुढे हिंदु स्मशानभुमी मार्गे वैभव हॉटेलकडे जातील. तर, स्वामी समर्थ चौकातून उजव्या बाजूला वळण घेऊन पुढे कानसई मार्गे सुभाष टेकडी रस्त्याने उल्हासनगरला जातील, असा सर्व वाहनांना पर्यायी मार्ग असेल. वैभव हॉटेलकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशनमार्गे मटका चौकापर्यंत येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वैभव हॉटेलच्या इथे प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी आनंदनगर एमआयडीसी टी जंक्शन येथून फॉरेस्ट नाका, लादीनाका, मटका चौक मार्गे अंबरनाथ पश्चिम इथून पुढचा पर्यायी प्रवास करावा. तर औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही असाच प्रवास करावा लागणार आहे.
शिवाय, मटका चौकातून पूर्वेकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही फॉरेस्ट नाकामार्गे वैभव हॉटेल जावे लागेल. सोबतच, पूर्वेतून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे प्रवेश बंद असेल. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हुतात्मा चौकमार्गे प्रवास करावा लागेल. उल्हासनगरातील वाहने लोकनगरी बसस्थानकाकडून, कैलास कॉलनीकडून येणारी वाहने ओटी सेक्शन, हिललानी पोलीस ठाण्यामार्गे जातील. अशा पद्धतीने उल्हासनगर आणि अंबरनाथमधील सर्व वाहनांसाठी हा पर्यायी मार्ग असणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाहतूक बंदच्या काळामध्ये अंबरनाथ पूर्वेतील हिंदू स्मशानभुमी ते गोविंद तीर्थ पुलावर लहान वाहन पार्क करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंदू स्मशान भूमी बॅरिकेडपासून वाहने आत जातील आणि बाहेर पडतील. तर, मोठी वाहने लोकनगरी मैदान येथे पार्क होतील.
