परिवहन विभागाचा मास्टरप्लॅन
राज्यात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र आता परवान्याबाबत स्पष्ट नियम नसल्याने अनेक अडचणी आणि वाद निर्माण होत होते. हे टाळण्यासाठी आता सर्व ई-वाहनांना नियमांच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या नियमांनुसार प्रत्येक चालकाकडे वैध परवाना असणे आवश्यक असणार असून त्याच्याकडे वाहनांची अधिकृत नोंदणी केली जाईल. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण मिळवता येईल.
advertisement
सर्व कागदपत्रांसाठी एकाच ठिकाणी सिंगल विंडो सेवा
वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभाग सिंगल विंडो प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीमुळे सर्व कागदपत्रांची प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येईल आणि परवाना मिळवणे सोपे होईल. आता ई-वाहन चालकांनाही सीएनजी रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणेच कर, विमा आणि इतर नियमांचे पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
