प्रवासात किती वेळ वाचणार?
नव्या उड्डाणपुलामुळे आता प्रवाशांची दररोज आता 10 ते 15 मिनिटांची बचत होणार आहे.याआधी पामबीच मार्गावरुन प्रवाशांना शीव-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी सानपाडा मार्गे खुप जास्त वेळेचा वळसा घ्यावा लागत होता. त्यामुळे जास्त वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात होते.
उड्डाणपुलाची सविस्तर माहिती
हा उड्डाणपूल सुमारे 290 मीटर लांबीचा आणि साडेसहा मीटर रुंदीचा असा असून वाशीतील पामबीच सीटी बँकजवळ असलेल्या चौकातून थेट महामार्गाला जोडतो. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते आणि वाहनांना वेगवान मार्ग मिळतो.
advertisement
वाहनचालकाना या प्रकल्पासाठी अने वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती.पहिल्यांदा तर निविदेला पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता मिळाल्याने काम प्रलंबित होते. पण दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात होऊन आता या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
