मलेशियाची प्रगती आणि विकास यामधे तसेच भारत आणि मलेशिया यांचे संबंध दृढ करण्यामधे तिथल्या भारतीयांचे योगदान लक्षणीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत – मलेशिया संबंध दृढ करण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजना तसेच दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पीआयओ नेत्यांनीही पंतप्रधानांचे आभार मानले. भारतातील प्रगतीसाठी पंतप्रधान करत असलेल्या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली.
advertisement
मलेशियातील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या उपक्रमांबद्दल पीआयओ नेत्यांनी त्यांचे आभार मानले. या उपक्रमांमध्ये 1) मलेशियात पहिले भारतीय उच्चायुक्तालय सुरू करण्याचा भारताचा निर्णय 2) मलेशिया विद्यापीठात थिरुवल्लुवर केंद्र सुरू करण्याची घोषणा 3) थिरुवल्लुवर शिष्यवृत्ती 4) मलेशियात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सहाव्या पिढीपर्यंत ओसीआय कार्ड 5) मलेशियन भारतीय विद्यार्थ्यांच्या लाभासाठी 30 लाख मलेशिया रिंगीट भरपाईसह भारतीय शिष्यवृत्ती विश्वस्त निधी यांचा समावेश आहे.
पंतप्रधान आझाद हिंद फौजेतील (इंडियन नॅशनल आर्मी – आयएनए) बालक सेनेत सहभागी असलेले जेयराज राजा राव आणि नेताजी कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष राथाकृष्णन यांनाही पंतप्रधान भेटले. आयएनए आणि आयएनएचे निवृत्त अधिकारी यांच्या अविस्मरणीय शौर्याबद्दल आणि त्यागाविषयी पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. नेताजींच्या स्वप्नातील समर्थ आणि आधुनिक भारताच्या निर्माणासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
