इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत कोण?
या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लोकेश एम यांना पदावरून हटवण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावर झालेली ही मोठी कारवाई मानली जात असून, इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जात आहे. या अॅक्शनमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
विशेष चौकशी पथक
संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सरकारने तीन सदस्यीय विशेष चौकशी पथक म्हणजेच एसआयटी गठीत केलं आहे. या पथकामध्ये मेरठचे विभागीय आयुक्त, मेरठ झोनचे एडीजी आणि पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक घटनेच्या मुळाशी जाऊन जबाबदारी निश्चित करण्याचे काम करणार आहे.
केवळ 5 दिवसांची मुदत
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या विशेष चौकशी पथकाला आपला अहवाल सादर करण्यासाठी केवळ 5 दिवसांची मुदत दिली आहे. या पाच दिवसांत नेमका कोणाचा दोष होता आणि मॉलच्या कामात सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? याचा शोध घेतला जाणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये
27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. सेक्टर-150 मध्ये एका निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये युवराजची विटारा कार कोसळली. रिफ्लेक्टर नसल्याने युवराजला रस्त्यावरील त्या मृत्यूच्या सापळ्याचा अंदाज आला नाही. कार पाण्यात कोसळताच युवराजने आपल्या वडिलांना फोन केला आणि "पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलो, मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये," अशी आर्त हाक मारली. पण ढिल्ली सिस्टिम अन् मृत्यूच्या दारातून त्याला वाचवता आलं नाही.
