ही लग्नपत्रिका मराठीत आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, संविधानाकडून मिळालेल्या अधिकारांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी आणि आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे. या निमंत्रणानुसार लोकशाहीच्या महामुहूर्तावर मतदार आणि लोकशाहीचा विवाह होणार आहे. लग्नाचं ठिकाण तुमच्या जवळील मतदान केंद्र असल्याचं नमूद केलेलं आहे. आपले विनीत म्हणून 'आम्ही भारताचे लोक' असा उल्लेख आहे.
advertisement
हे आमंत्रण व्हायरल होताच अनेक युजर्सनी प्रत्येक मताचं मूल्य सांगितलं आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं की, ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये मतदान न केल्यास दंडही आकारला जातो. जर तुम्हाला कोणताही नेता निवडायचा नसेल तर तुम्ही 'नोटा'ला मतदान करू शकता. पण, मतदान करणं महत्त्वाचं आहे. एका युजरने लिहिलं की, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ती कार्डवर प्रिंट करण्याची गरज नाही. एका युजरने या निमंत्रण पत्रिकेवर टीकाही केली आहे. तो म्हणाला की, या कथानकात ट्विस्ट आहे. लोकशाही नवरदेवाची अगोदरच फसवणूक करत आहे.
संविधानातील तरतुदीनुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेली आणि भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती मतदान करण्यास पात्र आहे. संबंधित व्यक्तीने मतदार यादीमध्ये आपली नाव नोंदणी केली तर ती आपल्या इच्छेनुसार कोणत्याही उमेदवाराला मतदान करू शकते. मात्र, काही मतदार मतदान करण्याबाबत उदासीनता दाखवतात. ते आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत.
