जेवणावरून परतलेल्या मित्रांना बसला जबर धक्का
मृत तरुणाचे नाव समर्थ संजय माळी असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील होता. काही दिवसांपासून तो मित्रांसोबत आकुर्डीत वास्तव्यास होता. दुपारच्या वेळी त्याचे मित्र जेवणासाठी बाहेर गेले होते. त्या दरम्यान तो खोलीत एकटाच होता. मित्र परत आल्यानंतर दरवाजा उघडला असता ही घटना उघडकीस आली.
मित्रांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
advertisement
तरुणाने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नैराश्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
