TRENDING:

दोन भाऊ वेगळे राहतात अशावेळेस पुर्वजांचे पितृपक्षात श्राद्ध कोणी घालायचे? धार्मिक नियम काय?

Last Updated:

Pitru Paksha 2025 : पितृपक्षाला सुरवात झाली आहे. 'पितृपक्ष' हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात आपल्या पितरांना स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि नैवेद्य दाखवले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पितृपक्षाला सुरवात झाली आहे. 'पितृपक्ष' हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात आपल्या पितरांना स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि नैवेद्य दाखवले जाते. असे मानले जाते की या 15 दिवसांत पितर पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांकडून अन्न, पाणी व श्राद्ध स्वीकारतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. मात्र, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेकदा असा प्रश्न उपस्थित होतो की दोन भाऊ वेगळे राहात असतील, तर पितृपक्षाचा नैवेद्य कोणी दाखवायचा? धार्मिक शास्त्र आणि परंपरेनुसार याबाबत स्पष्ट नियम सांगितले गेले आहेत.
pitrupaksha 2025
pitrupaksha 2025
advertisement

धर्मशास्त्र काय सांगते?

धर्मशास्त्रानुसार, श्राद्धकर्माचा पहिला अधिकारी हा घरातील ज्येष्ठ पुत्र मानला जातो. म्हणजेच जर वडिलांचे निधन झाले असेल, तर त्यांच्या स्मरणार्थ पितृपक्षात श्राद्धविधी करण्याची जबाबदारी मोठ्या मुलाची असते. जर दोन भाऊ एकत्र राहत असतील तर मोठा भाऊच सर्व कुटुंबीयांच्या वतीने श्राद्ध करतो. मात्र, दोघे वेगळे राहत असतील तर परिस्थिती थोडी बदलते.

advertisement

शास्त्र सांगते की, पितरांना नैवेद्य दाखवण्यामध्ये श्रद्धा आणि निष्ठा याला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्यामुळे मोठा भाऊ वेगळ्या घरात राहत असला तरी त्याने आपल्या घरात पितृपक्षाचे विधी करावेत. त्याचबरोबर लहान भावालाही आपल्या घरात तर्पण व नैवेद्य दाखवता येतो. यात काही चुकीचे मानले जात नाही. कारण पितरांना आपल्या वंशजांकडून केलेल्या प्रत्येक विधीचा स्वीकार होतो.

advertisement

तथापि, एकवाक्यता आणि एकोप्याचे महत्त्व शास्त्रांनी अधोरेखित केले आहे. शक्य असेल तर भाऊ एकत्र येऊन पितृपक्षाचे श्राद्ध करणे अधिक पुण्यकारक मानले जाते. एकत्र केल्याने संपूर्ण कुटुंबाच्या वतीने पितरांचे समाधान होते. परंतु जर अंतर, परिस्थिती किंवा इतर अडचणींमुळे हे शक्य नसेल, तर स्वतंत्रपणे केलेले विधी देखील ग्राह्य धरले जातात.

पितृपक्षातील श्राद्धविधीत नैवेद्य दाखवताना नियम काय?

advertisement

श्राद्धाची योग्य वेळ दुपारची (मध्यान्ह) मानली जाते. नैवेद्यात शिजवलेला भात, मूग डाळ, तुपातील पिंड आणि ऋषी-देवतांना अर्पण करण्यासाठी योग्य पदार्थ ठेवले जातात. या काळात अन्न आधी चाखून पाहू नये, देवांच्या मूर्तींना स्पर्श करू नये आणि पूर्ण शुद्धतेत विधी करावेत, असे सांगितले आहे.

धर्मशास्त्रात स्पष्ट केले आहे की, मोठा भाऊ असला तरी लहान भावाला श्राद्ध करण्यास मनाई नाही. उलट, दोघेही आपापल्या घरात पितरांना नैवेद्य दाखवले, तर पितर अधिक प्रसन्न होतात. कारण पितरांना आपल्या संततीकडून श्रद्धेने केलेली प्रत्येक कृती महत्त्वाची वाटते.

advertisement

प्रश्न असा नाही की नैवेद्य कोण दाखवणार, तर श्रद्धेने पितरांना स्मरण करण्याचा आहे. मोठा भाऊ परंपरेनं पहिला अधिकारी असला तरी, लहान भाऊ देखील पितृपक्षात नैवेद्य दाखवून पितरांना संतुष्ट करू शकतो. दोघेही वेगळे राहत असतील, तरी प्रत्येक घरात केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना पोहोचते, असे धर्मशास्त्रात नमूद आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर, पितृपक्षात नैवेद्य दाखवण्याचा नियम मोठ्या भावाला प्राधान्य देतो; परंतु दोन्ही भाऊ वेगळे राहत असले तरी श्रद्धेने आपापल्या घरात पितरांची पूजा केली, तर त्यात काही गैर नाही. पितरांच्या आशीर्वादासाठी श्रद्धाच सर्वात महत्त्वाची आहे.

(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/अध्यात्म/
दोन भाऊ वेगळे राहतात अशावेळेस पुर्वजांचे पितृपक्षात श्राद्ध कोणी घालायचे? धार्मिक नियम काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल